गेले वर्षभर हार्दिक पटेल " पटेल" समाज्याला आरक्षण देण्यासाठी लढत आहे . " पटेल" समाजासाठी आरक्षण हवा आहे म्हणून आंदोलन करत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ?
पटेल समाज हा गुजरातचा सर्वात प्रगत श्रीमंत आणि राजकीय शक्तीवर वर्चस्व असणारा समाज अहे. सगळ्यात जास्त जमिनी हक्क त्यांचा आहे , उद्योग क्षेत्रात पटेल समाज पुढे आहे , सगळ्यात जास्त NRI त्यांचे आहेत ,१/३ भाजपा चे आमदार पटेल आहेत , राज्य मंत्रिमंडळात सगळ्यात महत्वाची खाती पटेल समाजाकडे आहेत . शिक्षण संस्था त्यांचा आहेत, अश्या समाजाला न्यायालय पण आरक्षण नाकाराणारच आणि तेच झाला
मग इतका सगळा असताना का गरज पडली पटेल समाजाला आरक्षणाच्या मागणीची ? त्यासाठी गुजरात जाणला पाहिजे. खूप काळापासून सरकारी नोकरी ची भरती तिकडे झाली नाही , नाही म्हणायला गेल्या पाच वर्षात फक्त १०००० लोकांना सरकारी नोकरी मिळाली आहे ती पण पोलीस आणि शिक्षण सहायक म्हणून , हे हेच दर्शवत आहे की मुबलक नोकरी निर्माण नाही झाल्या सरकारी क्षेत्रात आणि ज्या संधी झाल्या त्या घेण्यात पटेल समाज मागे पडला .
मग प्रश्न येतो इतका प्रगत समाज मागे का पडला त्याचे उत्तर दडला आहे गुजरात शिक्षण व्यवस्थेत !
एक आढावा घेऊ गेल्या २५ वर्षातील गुजरात आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा यांचा मुळात हि परीक्षा देणारे कमी आहेत पटेल समाजातर्फे, आणि हि परीक्षा पास केलेले विद्यार्थी आहेत दलित ,आदिवासी इतर मागास वर्गातील, त्यांना आरक्षणाचा जरूर लाभ झाला असेल , पण बाकीच्या राज्यातील खुला वर्गातील तर मुले हि परीक्षा पास होत आहेत .
मुळात समस्या आहे ती गचाळ शिक्षण व्यवस्था , प्राथमिक शिक्षणाचे तर तीन तेरा वाजले आहेत शाळांची स्थिती खूप खराब आहे . शिक्षण फक्त देखाव्यासाठी केला गेला “विकसित राज्य” च्या नावामुळे कुणाचा लक्ष पण नाही गेला तिकडे . महिना ३००० रुपड्या वर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली ज्यांचा दर्जा हि खालावलेला होता आणि मुळात त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार सरकार . याच मुले गुजराती तरुण मागे पडत गेला बाकीच्या राज्याच्या युवकांच्या तुलनेत . कुठल्याही मोठ्या शहरात बघा दुसऱ्या राज्यांची पोरे नोकऱ्या करताना दिसतात पण गुजराती अपवादानेच दिसतील. गुजरात सरकार याच आंधळ्या विश्वासात राहिले कि अजून खूप राज्य आहेत आपल्या पेक्षा मागासलेली शिक्षणाच्या क्षेत्रात लोकांच्या मनावर पण हेच बिंबवण्यात आले . पण खरी परिस्थिती खूप वेगळी आहे शेतीतून मुबलक पैसा येत नाहीये पटेल काय कोणताच समाजाला ज्याद्वारे ते कदाचित गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकतील आपल्या मुलांना . आणि वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची फी तर खूप जास्त आहे.
याच मूळे पटेल समाज एकटावला आहे आरक्षणाच्या मागणी साठी जशे दलित, आदिवासी, इतर मागास वर्गातील युवक निदान आरक्षणाचा लाभ घेऊन नोकऱ्या मिळवत आहेत तसाच ते हि करू इच्छितात .
तरुण युवकांची स्वप्नाचा चुराडा होत आहे आणि मग येते ते frustration निराशा, आणि जन्माला येतो हार्दिक पटेल , जो मागणी साठी हाती बंदूक नक्षलि मार्ग घेण्याचा खुलेआम इशारा देतो , त्याला पूर्ण समर्थन पण मिळणार भरगोस पाठिंबा पण कारण बेरोजगार युवकांकडे एकच हत्यार असतो तो म्हणजे आंदोलन !
आता तुम्हीच ठरावा नक्की कोण दोषी
No comments:
Post a Comment